Monday, January 27, 2020

मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक महत्वाच्या योजना आणि प्रकल्प गेले 5 वर्ष आपल्या सरकारच्या काळात हाती घेण्यात आले.


मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक महत्वाच्या योजना आणि प्रकल्प गेले 5 वर्ष आपल्या सरकारच्या काळात हाती घेण्यात आले. ते सारे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आणि इतरही अनेक प्रश्नांसाठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद येथे आज लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होतो.

आमचे नेते, प्रेरणास्थान लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांना पुष्पांजली अर्पण केली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेजी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रीतमताई मुंडे आणि इतर अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

या भागाने सातत्याने दुष्काळ सोसला आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळालेच पाहिजे,ही आमची मागणी आहे. त्यादृष्टीने मोठा पुढाकार घेण्यात आला होता. राज्य सरकारने हे सर्व प्रयत्न पुढे न्यायला हवे. श्रेय त्यांना घ्यायचे असेल,तर त्यांनी जरूर घ्यावे, पण प्रश्न सुटले पाहिजे.

आज हे उपोषण केवळ स्मरण आहे, पण प्रश्न सुटले नाही आणि रेंगाळत राहिले तर पंकजाताईच्या नेतृत्वात जनता रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. राज्य सरकारने नियोजनाप्रमाणे काम केले तरी प्रश्न सुटणार आहेत, फक्त त्यांनी ती इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे!

मराठवाडा दुष्काळमुक्त झालाच पाहिजे. आघाडीचे सरकार असताना या भागावर सातत्याने अन्याय व्हायचा. जलयुक्त शिवारातून मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी जलक्रांती झाली. राज्याचा एकात्मिक जलआराखडा आपल्या सरकारने तयार केला.

No comments:

Post a Comment