Saturday, November 9, 2019

श्रीरामजन्मभूमीसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो.


श्रीरामजन्मभूमीसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो. 
भारतीय न्यायप्रणालीतील प्रत्येक घटकाचे मी मनापासून आभार मानतो ! 
सर्वच पक्षकार आणि संबंधितांना पुरेसा वेळ आणि संधी देऊन हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायप्रणालीवरील सर्वसामान्यांचा विश्वास यामुळे अधिक दृढ होणार आहे. हा निकाल म्हणजे कुणाचाही विजय किंवा पराजय नाही.
माझी विनंती आहे की, सर्व धर्म आणि समुदाय यांनी या निकालाचा सहजभावाने स्वीकार करावा आणि शांतता-सौहार्द राखण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. राष्ट्रीय ऐक्य, देशाच्या अखंडशक्तीला भक्कम करण्याची ही वेळ आहे.
देशातील जनभावनेचा आदर करणारा हा निर्णय आहे. अनेक दशके ही प्रक्रिया सुरू होती, सर्व घटकांचा विचार या निकालातून प्रतिबिंबीत होतो. सत्य आणि न्यायाच्या मंथनातून अखेर हा निकाल आला आहे.
हा ऐतिहासिक निर्णय एकमताने येणे, याला अधिक महत्त्व आहे. हा निकाल आपल्या देशाच्या बहुभाषिय, बहुधार्मिक सौहार्दतेला बळकटी देणारा ठरेल, हा मला पूर्ण विश्वास आहे. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी अपेक्षिलेला भारतभक्तीचा भाव अतिशय महत्वाचा आहे.
प्रभूश्रीरामचंद्रांच्या आदर्शांचा स्वीकार करीत, हा निकालाचा सर्वांनी स्वीकार करावा. यातूनच ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’च्या दिशेने भक्कम वाटचाल होणार आहे. देशातील एक मोठा विवाद आता यामुळे संपला आहे.

No comments:

Post a Comment